भारताने जिंकली एकदिवसाच्या सामन्यांची तिरंगी मालिका   

कोलंबो : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामन्यामध्ये यजमान श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे. या दोन संघांशिवाय या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सहभाग होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेतील चार पैकी १ सामना जिंकत स्पर्धेतून आउट झाला होता.
 
भारत-श्रीलंका यांच्यातील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या फायनल सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात  ३४२ धावांचा डोंगर उभारून लंकेसमोर ३४३ धावांचे टार्गेट सेट केले होते.
 
या धावांचा पाठलाग करातना श्रीलंका महिला संघ ४८.३ षटकात २४५ धावांत आटोपला. गोलंदाजीत भारताकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक ४ बळी घेतल्या. तिच्याशिवाय अमनजोत कौरनं ३ विकेट्स आणि नल्लापुरेड्डी श्री चरणी हिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. फायनल लढतीत स्मृती मानधना हिने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. तिच्याशिवाय सलामीची बॅटर प्रतिका रावल ३० (४९), हरलीन देओल ४७ (५६), हरमनप्रीत कौर ४१(३०), जेमिमा रॉड्रिग्ज ४४ (२९) यांनी उपयुक्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले. 
 
तळाच्या फलंदाजीतल अमजोत कौरनं १२ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. दीप्तीनं १४ चेंडूत नाबाद २० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ७ बळींच्या मोबदल्यात ३४२ धावांपर्यंत पोहचवली.भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन महिला संघाची  सुरुवात खराब झाली. अमनजोत कौर हिने पहिल्याच षटकातील तिसर्‍या चेंडूवर श्रीलंकेची सलामीची बॅटर हसिनी परेरा हिला शून्यावर पॅव्हेलियनचा दाखवला. 
 
विश्मी गुणरत्नेच्या रुपात दुसरा बळीही अमनजोत कौरनेच घेतला.मग स्नेह राणा पिक्चरमध्ये आली. तिने सेट झालेल्या श्रीलंकन कॅप्टन चामरी अट्टापट्टू हिला ५१ धावांवर बाद केले. ४८ धावा करणारी निलक्षीडी सिल्वाही तिच्याच जाळ्यात फसली.अन् श्रीलंकेसाठी सामना अवघड झाला. ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी यजमानांना धक्क्यावर धक्के देत श्रीलंकेचा डाव २४५ धावांवर आटोपला. फायनल बाजी मारत भारतीय महिला संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या ट्रॉफीवरआपले नाव कोरले.  

Related Articles